शिक्षक हा समाज घडवण्याचं, पिढी घडवण्याचं काम करत असतो. अनेकदा अनेक शिक्षक तळमळीने शिकवतही असतात. मात्र अशा शिक्षकांबाबत कधीकधी मन सून्न करणाऱ्या बातम्याही समोर येतात. अशीच एक वाईट बातमी पुण्यातल्या दौंड तालुक्यात घडला आहे. विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने जिल्हा परिषद शिक्षकाने आत्महत्या केली.

दौंड तालुक्यात असलेल्या जावजी बुवाची वाडी या ठिकाणी ही घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन महिन्यांपूर्वी अरविंद देवकर यांची दोन महिन्यांपूर्वी बदली झाली. मात्र विद्यार्थी शाळा सोडून गेले. ही बाब अरविंद देवकर यांच्या मनाला इतकी लागली की तणनाशक पिऊन अरविंद देवकर यांनी आयुष्य संपवलं. दोन महिन्यांपूर्वीच अरविंद देवकर यांची बदली झाली आहे.

Bribe from education officer to start liquor shop near school
नंदुरबार : शाळेजवळ दारु दुकान सुरु करण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्याकडून लाच
Clerk killed in dispute between founder teacher of Siddhartha Science College in Gondia
संस्थापक-शिक्षकाच्या वादात लिपीकाची हत्या; गोंदियातील सिद्धार्थ विज्ञान महाविद्यालयातील घटना
question paper, late, law students,
विधि शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हाती एक तास उशिरा प्रश्नपत्रिका, मुंबईतील न्यू लॉ महाविद्यालयातील प्रकार
students in 5th 8th failed in pune city
पाचवी,आठवीच्या अनुत्तीर्णांमध्ये शहरातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त
shikrapur jategaon robbery marathi news, shikrapur robbery marathi news
पुणे: शिक्रापूर परिसरात दरोडा; ज्येष्ठ महिलेचा खून
kalyan school student injured marathi news
कल्याणमध्ये दारूची बाटली डोक्यात पडल्याने विद्यार्थी गंभीर जखमी
teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”

गावातील छोट्याश्या शाळेची दुरवस्था पाहून अरविंद यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेतल. त्यानंतर त्यांच्या मदतीने शाळा स्वच्छ करुन घेतली. श्रमदान आणि इतर गोष्टींचंही महत्त्व या माध्यमातून मुलांना पटवून देण्याचा अरविंद यांचा हेतू होता. मात्र अरविंद देवकर यांचा हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पालकांना पटला नाही. त्यांनी शाळेत येऊन गोंधळ घातला आणि मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये हलवलं. शाळेतील सर्व १० विद्यार्थी ही शाळा सोडून गेल्याने अरविंद देवकर यांचं मानसिक खच्चिकरण झालं. चांगलं काहीतरी करण्याच्या हेतूने केलेल्या कृतीमुळे सर्वच विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने त्यांनी तणनाशक औषधाचं सेवन करुन आत्महत्या केली. चिठ्ठीत हा सगळा घटनाक्रम अरविंद देवकर यांनी लिहून ठेवला आहे. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.