पुण्यातील येरवडा भागातील पर्णकुटी पायथा परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. या प्रकरणी एका कचरावेचकास अटक करण्यात आली असून त्याने महिलेवर बलात्कार करुन तिचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे.

सतिष संतोष हारवडे (वय ४५, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. येरवड्यातील पर्णकुटी पायथा भागातील झुडपात एका महिलेचा मृतदेह आठवड्यापूर्वी सापडला होता. मृतदेह सडलेला होता. त्यामुळे महिलेची ओळख पटविण्यात अडचण आली होती. घटनास्थळी पोलिसांना टोपी आणि चप्पल सापडली होती. महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे आदेश दिले होते.

mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Rameshwaram Cafe Bomb Blast Case
रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सूत्रधारासह एकाला अटक; एनआयएची मोठी कारवाई
in Pimpri Three Women Attempt Suicide by Fire Themselves Protest Land Survey Officer
पिंपरी : जमीन मोजणीला विरोध करत तीन महिलांचा पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
hotel owner attempts suicide in front of police station
हॉटेल व्यावसायिकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न; काय आहे प्रकार?

सीसीटीव्ही चित्रीकरणात घटनास्थळापासून काही अंतरावर दिसून आला कचरा वेचक –

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, उपनिरीक्षक अंकुश डोंबळे, पोलीस कर्मचारी अनिल शिंदे, कैलास डुकरे, गणपत थिकोळे, सूरज ओंबासे आदींनी तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातीली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात घटनास्थळापासून काही अंतरावर टोपी घातलेली व्यक्ती कचरा वेचत असल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी भंगार माल खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांकडे चौकशी सुरू केली. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हारवडे नदीपात्रातील चिमा घाट परिसरात एका बाकावर झोपल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने महिलेवर बलात्कार करुन खून केल्याची कबुली दिली, असे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.