भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला ६५ वर्षे होत असून २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या, असे आवाहन शिक्षक हितकारिणी संघटनेने केले आहे.
घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या विषयी समाजामध्ये पुरेशी जागरूकता नसल्याने लोकशाहीवर निष्ठा असलेल्या संघटनांच्या मागणीनुसार राज्य सरकारने २००८ मध्ये शासकीय अध्यादेश काढला आहे, अशी माहिती शिक्षक हितकारिणी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश पवार यांनी दिली.
संविधान दिन साजरा करण्यासंदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला असला, तरी संविधान दिन साजरा करण्याबाबत मोठी उदासिनता दिसून येते. केवळ शासकीय पातळीवर हा दिवस साजरा केला जात असून संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शासकीय कार्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करावी, असे आवाहन प्रकाश पवार यांनी केले आहे.

Monsoon session of Parliament from tomorrow Budget on Tuesday
संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून; मंगळवारी अर्थसंकल्प
congress leader priyanka gandhi criticizes pm modi over job creation for youth
पंतप्रधानांनी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात; प्रियंका गांधी वढेरा यांची मागणी
jammu and kashmir
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या अधिकारात केली वाढ
PM Modi tells President Putin amid attacks on Ukraine
युद्धाने प्रश्न सुटत नाहीत! भारत-रशिया शिखर परिषदेदरम्यान मोदी यांचे खडेबोल
there is no appointment of full time union minister from rrs in state bjp
रा. स्व. संघाकडून प्रदेश भाजपमध्ये पूर्णवेळ संघटनमंत्र्यांची नियुक्तीच नाही, केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्याकडेच जबाबदारी
Thane Municipal corporation, Thane Municipal Corporation action against Illegal Pubs and Bars, Anti encroachment campaign of thane municipal corporation, chief minister Eknath shinde order action against illegal pubs, thane news,
बेकायदा पब, बारवर हातोडा; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र
Eight lakh houses to be completed under Pradhan Mantri Awas Yojana
पंतप्रधान आवास योजनेत पावणे आठ लाख घरे पूर्ण
Akhilesh Yadav party MP wants Constitution to replace Sengol
संसदेत सेंगोल नको, संविधान हवं; सपा खासदाराच्या मागणीनंतर विरोधक-सत्ताधाऱ्यांचं ‘महाभारत’