पुणे : अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे विरोधक शिवाजी आढळराव यांच्या भैरवनाथ पतसंस्था तसेच पीडिसीसी बँकेबाहेर पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. नौटंकी ढंगात कोल्हे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. मी कधी पतसंस्थेत राजकारण आणलं नाही. पतसंस्था ही जनतेच्या हितासाठी असल्याचं आढळराव म्हणाले. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

शिवाजी आढळराव यांनी अमोल कोल्हे यांचा चांगलाच समाचार घेतला. कोल्हे यांनी नुकतच ते मालिका क्षेत्रातून पाच वर्षांसाठी संन्यास घेणार असल्याचे म्हटल आहे. यावरून आढळराव म्हणाले, अमोल कोल्हे यांचा हा चुनाव जुमला आहे. पाच वर्षांपूर्वी देखील असच त्यांनी संन्यास घेणार असल्याचे म्हटले होत. तसा व्हिडिओ शिवाजी आढळराव यांनी दाखवला. त्यामुळे कोल्हे यांच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. हा त्यांचा चुनावी जुमला आहे. असा टोला त्यांनी अमोल कोल्हे यांना लगावला आहे.

Water sufficient for Pune city for one month was released for rural areas from khadakwasla dam
पुण्याच्या पाण्यावर ‘बारामती’चा डल्ला… झाले काय?
raj thackeray
पुण्यातील सभेत राज ठाकरेंकडून अजित पवारांचं कौतुक; म्हणाले, “या माणसाने कधीही…”
amol kolhe
मतदानाला दोन दिवस बाकी असताना डॉ. अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय, म्हणाले, ‘पुढील पाच वर्षांसाठी ब्रेक…’
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
radhika sarathkumar
सुपरहिट चित्रपट, दोन घटस्फोट, तीन लग्नं अन्…; ऋषी कपूर यांची ‘ही’ हिरोईन आहे सुप्रसिद्ध क्रिकेटपटूची सासू
Devendra Fadnavis
शरद पवारांनी एनडीएत येण्याच्या पंतप्रधान मोदींच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचारावर ‘पाणी’… वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पुढे ते म्हणाले, अमोल कोल्हे यांना त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळे ते दररोज नवीन आरोप करत आहेत. संस्थेबद्दल कोल्हे यांनी तक्रार करावी. प्रशासनाला वाटल्यास ते पोलीस बंदोबस्त वाढवतील. अस ही त्यांनी नमूद केलं.