पुणे : भारतातील बालमृत्यूंच्या प्रमाणात मागील पाच वर्षात लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. २०१४ मध्ये दर एक हजार बालकांमागे ४५ एवढे असलेले बालमृत्यू २०१९ पर्यंत दर एक हजार बालकांमागे ३५ पर्यंत कमी झाले आहेत. गर्भवती महिलांमधील रक्तक्षय (ॲनिमिया) नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेले उपचार, पुरवलेली औषधे, चांगल्या आहाराबाबत जनजागृती आणि बालकांच्या स्तनपानाबाबत आग्रह या कारणांमुळे बालमृत्यू कमी करण्यात यश येत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी ‘पालन’ या मोबाइल ॲपच्या उद्घाटनाच्या निमित्ताने याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत बाल आरोग्य कार्यक्रम आणि सर्वसमावेशक प्रयत्नांमुळेच बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणणे शक्य झाल्याचे या वेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Significant reduction in infant mortality in india pune print news zws
First published on: 18-08-2022 at 22:08 IST