पुणे : येरवडय़ातील इमारतीचा स्लॅब कोसळून झालेला अपघात हा निष्काळजीपणामुळेच झाल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात नोंदवला आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त दहा सदस्यीय समितीने त्याबाबतचा अहवाल सादर केला आहे. लोखंडी सळईच्या जाळय़ांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेत योग्य नियंत्रण, समन्वय नव्हते तसेच या कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

येरवडय़ातील शास्त्रीनगर येथील ब्लू ग्रास बिझनेस पार्क या व्यावसायिक संकुलाचा स्लॅब कोसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दुर्घटनेची वस्तुस्थिती मांडली आहे. इमारतीच्या राफ्ट फाउंडेशनबाबतची बांधकाम कार्यपद्धती सदोष होती. लोखंडी जाळीची ठेवणी आणि बांधणी योग्य प्रकारे करण्यात आली नव्हती. जाळय़ांची बांधणी आणि उभारणी इमारतीच्या स्थापत्य आराखडय़ानुसार होणे आवश्यक होते. मात्र तसे न करता जाळय़ा टाकण्यात आल्या. योग्य तांत्रिक तपासणीही करण्यात आली नाही. इमारत बांधकामाच्या ठिकाणी संरक्षक कठडे बांधण्यात आले नाहीत, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. पोलीस, नगररचना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रेडाई आणि कामगार कल्याण कार्यालयाचे प्रतिनिधी, मुख्य अग्निशमन अधिकारी, संरचना अभियंता, वास्तुविशारद, महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांचा या चौकशी समितीमध्ये समावेश आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयालाही या दुर्घटनेबाबत तांत्रिक अभ्यास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका
pm photo on electricity bill
वीज बिलावरील नेत्यांच्या छायाचित्रांना विरोध; समाजवादी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार
ed claims in court arvind kejriwal key conspirator in liquor policy
केजरीवालच मुख्य सूत्रधार; मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा; सहा दिवसांची कोठडी