शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा सूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : करोना बाधित वाढल्याने राज्यस्तरावर सरसकट शाळा बंद करण्याची चूक राज्य शासनाने पुन्हा करू नये. विद्यार्थ्यांचे शिक्षण कायम सुरू राहण्याची आता नितांत गरज आहे. तसेच स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासंदर्भातील सुसूत्रतेसाठी मार्गदर्शक सूचनांची गरज असल्याचा सूर शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. करोना बाधितांची संख्या वाढल्याने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू झालेल्या असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने सरसकट शाळा बंदच्या निर्णयाला शिक्षण क्षेत्रातून तीव्र विरोध करण्यात आला. सरसकट सर्व शाळा बंद करण्यापेक्षा स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा देण्याची मागणीही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students education mistake closing school ysh
First published on: 21-01-2022 at 00:11 IST