लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: आपल्याकडील मोठ्या बँकांचे विलीनीकरण करून आणखी मोठ्या बँका तयार करण्यात येत आहेत. जागतिक पातळीवरील स्थिती पाहता मोठ्याच बँका कोसळत असल्याने आर्थिक संकट निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे छोट्या बँकांनाच आता सक्षम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

crime rate rise in pimpri chinchwad,
विश्लेषण : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडला गुन्हेगारीचा विळखा कसा बसला?         
Kalyan, Dombivli, army job fraud, Manpada police, fake appointment letters, youth scam, police investigation, kalyan news, thane news,
सैन्य दलात भरतीचे आमिष दाखवून डोंबिवली, कल्याणममधील भामट्यांकडून ४६ लाखाची फसवणूक
Anant Radhika Wedding
अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिल्याप्रकरणी अभियंत्याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Congress leader K C Venugopal gets Apple alert about mercenary spyware attack
‘सरकारकडून हेरगिरी!’ काँग्रेस नेत्याचा आरोप; ॲपल कंपनीने पाठवलेल्या इमेलमध्ये काय म्हटलंय?
Trainee pratiksha bhosle police officer commits suicide due to lover betrayal Nagpur
प्रियकराने दगा दिल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Investigation closed by ED too Failure to trace the source of income in the offenses against the vicar
‘ईडी’कडूनही तपास बंद? वायकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांत उत्पन्नाचा स्राोत शोधण्यात अपयश
Irregularities in government onion purchase two officers of Nafed arrested
सरकारी कांदा खरेदीत अनियमितता, नाफेडच्या दोन अधिकाऱ्यांची उचलबांगडी
pune, pune Forest Department, PETA Rescue Parrots, Rescue Parrots from Aundh, PETA, Legal Action Taken, parrot news,
डांबून ठेवलेल्या तीन पोपटांची सुटका ‘पेटा इंडिया’, वन विभाग यांची संयुक्त कारवाई

भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात प्रभू बोलत होते. या वेळी सुरेश प्रभू म्हणाले,की देशातील मोठ्या बँकांचे विलीनीकरण करून त्या आणखी मोठ्या करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे देशातील प्रमुख बँकांमध्ये आपल्या बँकांचीही नावे येतील, असा युक्तिवाद केला जातो. मोठी बँक सहजासहजी कोसळणार नाही, असेही सांगितले जाते. प्रत्यक्षात जागतिक पातळीवर मोठ्या बँका कोसळत असून, त्यांच्यामुळे आर्थिक संकट निर्माण होत आहे. या बँकांना सरकारकडून मदत दिली जात असून, ती पर्यायाने करदात्यांच्या पैशातून केली जात आहे. मोठ्या बँकांपेक्षा छोट्या बँकांना पाठबळ देण्याची गरज आहे. छोट्या बँकांना मदत करून ताकद दिल्यास त्या प्रगतीत मोठा हातभार लावतील.

आणखी वाचा- पुणे-मुंबई थेट विमानसेवा सोयीची की गैरसोयीची? विमानांच्या वेळांबाबत प्रश्नचिन्ह

पुरुषप्रधान संस्कृतीऐवजी महिलांनी समाज चालवल्यास सगळेच प्रश्न सुटतील, असे सांगून प्रभू म्हणाले, की महिला या सक्षमपणे घर चालवतात. इतर देशांच्या तुलनेत भारतात महिलांची स्थिती चांगली आहे. भारतातील महिलांना किमान वेतन दिले तरी देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न २ ते ३ टक्क्याने वाढेल, असा अहवाल आहे. त्यामुळे महिलांच्या हाती सूत्रे दिल्यास देशाची प्रगती अतिशय वेगाने होईल.