लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: आपल्याकडील मोठ्या बँकांचे विलीनीकरण करून आणखी मोठ्या बँका तयार करण्यात येत आहेत. जागतिक पातळीवरील स्थिती पाहता मोठ्याच बँका कोसळत असल्याने आर्थिक संकट निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे छोट्या बँकांनाच आता सक्षम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात प्रभू बोलत होते. या वेळी सुरेश प्रभू म्हणाले,की देशातील मोठ्या बँकांचे विलीनीकरण करून त्या आणखी मोठ्या करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे देशातील प्रमुख बँकांमध्ये आपल्या बँकांचीही नावे येतील, असा युक्तिवाद केला जातो. मोठी बँक सहजासहजी कोसळणार नाही, असेही सांगितले जाते. प्रत्यक्षात जागतिक पातळीवर मोठ्या बँका कोसळत असून, त्यांच्यामुळे आर्थिक संकट निर्माण होत आहे. या बँकांना सरकारकडून मदत दिली जात असून, ती पर्यायाने करदात्यांच्या पैशातून केली जात आहे. मोठ्या बँकांपेक्षा छोट्या बँकांना पाठबळ देण्याची गरज आहे. छोट्या बँकांना मदत करून ताकद दिल्यास त्या प्रगतीत मोठा हातभार लावतील.

आणखी वाचा- पुणे-मुंबई थेट विमानसेवा सोयीची की गैरसोयीची? विमानांच्या वेळांबाबत प्रश्नचिन्ह

पुरुषप्रधान संस्कृतीऐवजी महिलांनी समाज चालवल्यास सगळेच प्रश्न सुटतील, असे सांगून प्रभू म्हणाले, की महिला या सक्षमपणे घर चालवतात. इतर देशांच्या तुलनेत भारतात महिलांची स्थिती चांगली आहे. भारतातील महिलांना किमान वेतन दिले तरी देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न २ ते ३ टक्क्याने वाढेल, असा अहवाल आहे. त्यामुळे महिलांच्या हाती सूत्रे दिल्यास देशाची प्रगती अतिशय वेगाने होईल.