scorecardresearch

Premium

वंदे भारत एक्स्प्रेस ‘फुल’; पण उत्पन्न ‘हाफ’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा धडाका लावला आहे. देशभरात सध्या एकूण १८ वंदे भारत सुरू आहेत.

vande bharat express
(वंदे भारत एक्सप्रेस)

संजय जाधव

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा धडाका लावला आहे. देशभरात सध्या एकूण १८ वंदे भारत सुरू आहेत. यातील मुंबई ते सोलापूर वंदे भारतला सर्वाधिक प्रवासी असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. मात्र, प्रवासी संख्या जास्त असूनही या गाडीचे उत्पन्न सुमारे ५० टक्केच असल्याची बाब समोर आली आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
marathi women denied flat in mulund west viral video
“महाराष्ट्रीयन अलाऊड नाही” म्हणणाऱ्या बाप-लेकानं मराठी महिलेची मागितली माफी; नेमकं घडलं काय होतं? पाहा Video!

केंद्र सरकार आणि रेल्वेकडून वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचा दावा केला जातो. वंदे भारत सेमी-हायस्पीड असून, त्यात जागतिक दर्जाच्या सुविधा प्रवाशांना दिल्या जात आहेत. यामुळे या गाडीचे तिकीटही इतर एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा जास्त आहे. मुंबई ते सोलापूर या गाडीला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. या गाडीची प्रवासी संख्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे कागदोपत्री दिसते. मात्र, उत्पन्न ५० टक्क्यांच्या आसपास आहे.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परीक्षेत गैरप्रकार: इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा ‘असा’ केला वापर

मुंबई-सोलापूर वंदे भारत ही गाडी १० फेब्रुवारीपासून सुरू झाली. फेबुवारी महिन्यात या गाडीच्या एकूण ३२ फेऱ्या झाल्या. गाडीतील प्रवासी संख्या ९० टक्के होती. त्यातून मिळालेले उत्पन्न ५८ टक्के होते. मार्च महिन्यात गाडीच्या ५२ फेऱ्या झाल्या. या महिन्यात प्रवाशांची संख्या ७८ टक्के आणि उत्पन्न ५१ टक्के होते. एप्रिल महिन्यात गाडीच्या ५२ फेऱ्या झाल्या. या महिन्यात प्रवासी संख्या ९४ टक्के तर उत्पन्न ६१ टक्के होते.

प्रवासी संख्येचे असेही गणित

रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्स्प्रेसचे एसी चेअरचे तिकीट ८५९ रुपये, तर एक्झिक्युटिव्ह चेअरकारचे तिकीट एक हजार ७६६ रुपये आहे. जास्त तिकीट दरामुळे मुंबई ते सोलापूर प्रवासात मुंबई ते पुणे दरम्यानच्या प्रवाशांची संख्या ८० टक्क्यांहून अधिक असते. पुढे पुण्यापासून सोलापूरपर्यंत गाडीत जेमतेम २० टक्केच प्रवासी उरतात. गाडीतील एकूण प्रवाशांची संख्या विचारात घेतली जाते. मात्र, जवळच्या अंतरात प्रवासी जास्त असले, तरी तिकीट कमी असल्याने उत्पन्न कमी मिळते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vande bharat express full but income is half pune print news stj 05 ysh

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×