कोकण- मराठवाडय़ात अतिवृष्टीचा इशारा
पुणे : पोषक हवामानाच्या स्थितीमुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती महाराष्ट्रात सध्या वेगाने होत आहे. निम्म्याहून अधिक राज्य मोसमी वाऱ्यांनी व्यापले असून, रविवापर्यंत ते कोकणातील बहुतांश भागास मुंबई व्यापतील, असा अंदाज आहे.
कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात प्रवेश केल्यानंतर दोनच दिवसांमध्ये मोसमी वाऱ्यांनी निम्म्याहून अधिक भाग व्यापला आहे. शनिवारी मोसमी वाऱ्यांनी मध्य महाराष्ट्रात आणखी काही भागात प्रगती केली. ते नगपर्यंत दाखल झाले आहेत. मराठवाडय़ात औरंगाबादपर्यंत त्यांनी मजल मारली. रविवापर्यंत कोकणातील उर्वरित भाग आणि मुंबईपर्यंत मोसमी वारे पोहोचण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्य़ात मोसमी वाऱ्यांचा प्रवेश झाला असून, रविवारी ते शहर व्यापून पुढे प्रगती करतील, असा अंदाज आहे.
कमी पाऊस..
नागपूर : विदर्भात शनिवारी अकोला वगळता कुठेच पाऊस झाला नाही. गेल्या तीन चार दिवसांपासून विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत ढगाळ वातावरण आहे. शनिवारी मात्र अकोला वगळता यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा आणि नागपूर व जिल्ह्य़ात पावसाचा पत्ता नव्हता.
सर्वाधिक पाऊस..
रत्नागिरी, जालना, परभणी, नांदेड, िहगोली, नाशिक, धुळे, नागपूर, जळगाव, औरंगाबाद या भागांसह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस होत आहे.