मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन सुरू असलेल्या राजकारणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय समितीचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना परखड भाष्य केले. धर्मावरून सुरू असलेले राजकारण चुकीचे असून प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे. धार्मिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून धार्मिक अभिव्यक्तीसाठी देशभरात एक नियमावली करायला हवी, असे त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धर्माच्या नावावर राजकारण केले जात असून प्रक्षोभक विधानांमुळे तेढ निर्माण केली जात आहे. राजकीय हेतूने अशा प्रकारची विधाने केली जातात. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. देशातंर्गत तसेच बाह्य शक्ती तेढ निर्माण करत आहेत. अशा प्रकारच्या विधानांमुळे देशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचे काम केले जात आहे. प्रत्येकाला आपले रितीरिवाज जपण्याचे अधिकार आहेत. एकमेकांच्या धर्माचा आदर करायला हवा. धार्मिक अस्मिता जरुर जपाव्यात. मात्र, जाणीवपूर्वक प्रक्षोभक विधाने करून तेढ निर्माण करणे चुकीचे आहे. धार्मिक रितीरिवाज, परंपरा, अभिव्यक्तींसाठी देशपातळीवर नियमावली करायला हवी. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकारांना आळा बसेल आणि सामाजिक ऐक्यही अबाधित राहील, असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले. मुस्लीम राष्ट्रीय मंचचे इरफान अली, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अली दारुवाला, अबु बक्र नकवी आदी यावेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We need common rules for religious things says rss pracharak indresh kumar pune print news scsg
First published on: 20-04-2022 at 16:59 IST