अतुल सुलाखे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोबा भूदानात लोकांशी सतत संवाद साधत. त्यात अभ्यास, कळकळ आणि क्रांतिकारी विचार असत. त्यांचा हा संवाद संकलित करणे ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. त्यातील बराच भाग संकलित झाला असला आणि त्यावर संशोधन झाले असले तरी हे काम काही पिढय़ांचे आहे. आजही एखाद्या वाडी वस्तीवर गीता प्रवचने दिसतात. ती ज्ञानेश्वरीसोबत आढळतात. एक मोठा समूह या यज्ञात सहभागी झाल्याच्या या खुणा आहेत. भूदानात फक्त ठरावीक गटाने जमीन द्यावी आणि काहींनी ती घ्यावी हे विनोबांना नामंजूर होते. हा यज्ञ आहे आणि त्यात प्रत्येक व्यक्तीचा सहभाग हवा हा त्यांचा आग्रह होता. मुळात त्यांना जमीन ‘देणे’ ही गोष्टही नामंजूर होती. तो गरिबांचा अधिकार आहे, असे सांगून त्यांनी दान शब्दातून येणाऱ्या नकारात्मकतेला छेद दिला.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samyayog vinoba in soil study dialogue compiled long process ysh
First published on: 24-11-2022 at 00:02 IST