‘एक अरविंद  राहिले..’ हे संपादकीय (३ ऑगस्ट) वाचले. अणुशास्त्रज्ञ  अनिल काकोडकर यांनी रा. स्व. संघ आणि स्मृती इराणी यांच्याशी मतभेद झाल्यामुळे आयआयटीतून  अंग काढून घेतले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रघुराम राजन यांना कर्जबुडव्या उद्योगपतींविरोधात कडक भूमिका घेतल्यामुळे मुदतवाढ मिळाली नाही. पद्मभूषण अरविंद पानगढिया यांना संघाच्या स्वदेशी जागरण मंचाच्या रोषाचे लक्ष्य होऊन काढता पाय घ्यावा लागला. नोबेल पुरस्काराने सन्मानित अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपटावर बंदी, मुंबई विद्यापीठाचे नीरज हातेकर, बुकर पुरस्कारप्राप्त अरुंधती रॉय, पद्मभूषण पुरस्कार परत केलेले ज्येष्ठ वैज्ञानिक भार्गव अशी आणखीही अनेक उदाहरणे सापडतील. हे सर्व जण ‘भारतीय’ हे राष्ट्रीयत्व असलेले ‘हिंदू’ आहेत. मात्र ते ‘हिंदुत्ववादी’ नाहीत. त्यामुळे सध्याच्या प्रचलित संकेतांनुसार हे देशद्रोही ठरतात. कारण मतदारांनी सध्या देशाचा सात-बारा हा हिंदुत्ववाद्यांच्या नावावर केलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनुकीय गुणसूत्रे ही अव्वल दर्जाची आहेत. भारतातील काळी-कसदार भूमीदेखील सुपीक आहे. असे असताना जागतिक कीर्तीचे नामांकित आपल्या देशात तयार होत नाहीत किंवा टिकून राहत नाहीत. याचे कारण आपल्या देशातील प्रदूषित हवा हे आहे. आधीचा लालफितीच्या पलीकडचा भ्रष्टाचार आणि आता सर्व क्षेत्रांतला कमालीचा धार्मिक विद्वेष, यामुळे प्रदूषित झालेले वातावरण गुणवत्तेला बहर येण्यास मारक ठरते. अर्थशास्त्र, विज्ञान, कला, इतिहास अशा सर्वच क्षेत्रांतील गुणवंतांनी माना टाकल्यावर सुमारांची सद्दी होणारच. गजेंद्र चौहान, पहलाज निहलानी, चेतन चौहान, स्मृती इराणी, सुब्रमण्यम स्वामी, अनुपम खेर, ऋषी कपूर यांच्यासारख्या सुमार बुद्धीच्या गणंगांना या राजवटीत उत्तम भवितव्य आहे. आता ही मंडळी हीच देशाची मौल्यवान अस्सल स्वदेशी संपत्ती आहे. राष्ट्र उभारणीत यांचे योगदान भारतमातेला महासत्ता बनवणार आहे.

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers letter part
First published on: 05-08-2017 at 02:16 IST