Chinese Smartphone Ban in India: भारतीय मोबाईल उद्योगासाठी ही बातमी खूप मोठी आणि महत्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत १२,०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सर्व चीनी स्मार्टफोन्सवर भारतात बंदी घातली जाऊ शकते. Xiaomi, Redmi, Realme, OPPO, Vivo, POCO, Infinix आणि TECNO यासह सर्व स्वस्त चायना मोबाईल फोनवर भारत सरकार बंदी घालू शकते.

चीनच्या मोबाईल फोनवर भारतात बंदी

१२,००० रुपयांपेक्षा कमी किमतीचे सर्व मोबाईल फोन जे चीनी कंपन्यांनी बनविले आहेत त्यांना भारतात बंदी घालू शकतात. भारत सरकार या विषयावर लवकरच आपला निर्णय जाहीर करू शकते. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टद्वारे ही बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये १५० डॉलरपेक्षा कमी किमतीच्या चायनीज स्मार्टफोन्सवर भारतात बंदी घालण्यात यावी, असं म्हटलं आहे. या निर्णयामुळे LAVA आणि Micromax सारख्या देशांतर्गत कंपन्यांना पुढे नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

कोणाचे नुकसान होणार?

सध्या भारतीय मोबाइल बाजारपेठेतील मोठ्या भागावर चिनी कंपन्यांचे राज्य आहे. यामध्ये Xiaomi, Redmi, Reality, Oppo, Vivo, Poco, Infinix आणि Tecno च्या नावांचा समावेश आहे. एंट्री लेव्हल स्मार्टफोन्स किंवा कमी बजेट मोबाइल फोन्सचा विचार केल्यास भारतीय मोबाइल वापरकर्ते या ब्रँडवर अधिक विश्वास दाखवतात. अशा परिस्थितीत, भारत सरकारने १२,००० रुपयांपेक्षा कमी बजेट असलेल्या सर्व चायनीज स्मार्टफोन्सवर खरोखरच भारतात बंदी घातली तर या कंपन्यांना नक्कीच मोठा फटका बसेल.

( हे ही वाचा: iPhone13 वर ऑफर्सचा पाऊस! मिळतेय ३० हजार रुपयांची घवघवीत सूट)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय मोबाइल ब्रँड्सना होणार फायदा

भारतीय बाजारपेठेत १२,००० रुपयांपर्यंतच्या बजेटपर्यंतच्या सर्व चायनीज स्मार्टफोनवर बंदी घालून सरकार भारतीय मोबाइल ब्रँडला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचा थेट फायदा मायक्रोमॅक्स आणि लावासारख्या कंपन्यांना होणार आहे. त्याचबरोबर भारत सरकारच्या या निर्णयानंतर कदाचित सॅमसंग आणि नोकिया सारख्या ब्रँडनाही फायदा होईल आणि या दोन्ही कंपन्या कमी बजेटच्या बाजारपेठेत अधिक सक्रिय होऊन कमी किमतीत स्वस्तात स्मार्टफोन बाजारात आणू शकतील.