वाडा तालुक्यातील प्रकार ; बोगस भातबियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान ‘विजया’ जातीचे गरवे भातबियाणे हे हळवे निघाले. हा धक्कादायक प्रकार वाडा तालुक्यातील मौजे पिक येथील शेतकऱ्याच्या शेतात घडला आहे. पालघर व ठाणे जिल्हय़ात भात उत्पादकांना हा अनुभव मिळत आहे. जालना येथील सफल बायो सीड या कंपनीचे हे बियाणे असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हे भातबियाणे अति गरव्या (१३५ ते १४० दिवसांचे) जातीतील असल्याने अनेक शेतकऱ्यांनी या भाताची लागवड गरव्या जमिनीत केली आहे. मात्र लागवड केल्यापासून ६० ते ७० दिवसांतच या भाताला निसावा येणे सुरू झाले आहे. दीपक पाटील या शेतकऱ्याने वाडा येथील एका कृषी सेवा केंद्रातून हे ‘विजया’ जातीचे भातबियाणे ४८ किलो खरेदी केले. चार एकर गरव्या जागेत त्याची लागवड केली. मात्र या लागवडीला ६० ते ७० दिवस होत नाही तोच हे सर्व भात निसावा येऊ न पूर्ण झाले आहे. या शेतामध्ये सध्या गुडघाभर पाणी असून पाऊ स पडणे सुरूच असल्याने त्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होणार आहे. दरम्यान, या शेतकऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर सफल बायो सीड कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष या शेतावर येऊ न पाहाणी केली. आम्ही या संदर्भात अधिक माहिती घेऊ न आपणास कळवितो, असे सांगून ते निघून गेले. १३५ दिवसांचे हे भातपीक भर पावसात अवघ्या १०० ते ११० दिवसांत तयार होणार असल्याने शेतातून ते बाहेर काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मजुरी खर्च तर येणार आहे. जवळपास दोन लाखांहून अधिक नुकसान होणार आहे. -दीपक पाटील, नुकसानग्रस्त शेतकरी यापुढे या परिसरात पाऊ स पडला नाही तर या शेतकऱ्याचे नुकसान न होता अधिक उत्पन्न मिळेल. मात्र पाऊस झाला तर त्यांच्या नुकसानीबाबत कंपनी निर्णय घेईल. -श्रीकांत सिरसावकर, प्रतिनिधी, सफल बायो सीड कंपनी