दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा (प्रिलिम्स) संपल्या, की शाळा-शाळांमधून 10th students farewell कार्यक्रम आयोजित केला जातो आणि विद्यार्थीदेखील त्याची जोरदार तयारी करतात.  पण हे सगळं करीत असताना त्यांच्या मनात संमिश्र भावना असतात. नवीन कॉलेजविषयी औत्सुक्य असतं, तर आपली शाळा आणि तेथील सुरक्षित वातावरणातून बाहेर पडावे लागणार याची रुखरुख असते.  हे लक्षात घेऊनच या दिवशी संपूर्ण शाळा या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन बाळगून, योग्य दिशेने वाटचाल करून यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करतात, आत्मविश्वास निर्माण करतात आणि गरज लागेल तेव्हा आम्ही तुमच्या मागे आहोत, हा विश्वास, आश्वासक आधारही देऊ करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवभक्त आदिवासी आश्रमशाळा (लव्हाळी, ता. अंबरनाथ) येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो, कारण १० वर्षे आश्रमशाळेत राहिल्याने तो भावनिकरीत्या जोडला गेलेला असतो. आदिवासी बांधवांची जीवनशैली सर्वसाधारण समाजापेक्षा खूपच वेगळी असल्याने मुख्य समाजप्रवाहात सामावून घेऊन स्वत:ला सिद्ध करणे हे या मुलांसाठी मोठे आव्हान असते. इयत्ता नववीचे विद्यार्थी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतात, तर दहावीचे विद्यार्थी आपले अनुभव सांगतात. गेल्या वर्षी पहिली आलेली विद्यार्थिनी निरगुडा हिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, कर्मचारी, अगदी शिपाईदेखील सर्वानी शुभेच्छा दिल्या. तुमच्या प्रयत्नांच्या बळावर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे आणि शाळा सदैव तुमच्यासाठी आहे, हा विश्वास देण्याचा, आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न साऱ्या भाषणांमधून प्रकर्षांने जाणवत होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10th students farewell
First published on: 02-03-2016 at 01:49 IST