ठाणे : उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत असून ठाणे जिल्ह्यातून एकूण ९४ हजार ९४१ विद्यार्थी यंदा परीक्षेला बसले आहेत. करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. या वर्षी विद्यार्थ्यांच्या लेखी स्वरूपात परीक्षा होणार असून ठाणे जिल्ह्यात एकूण ४१९ केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून शाळा, महाविद्यालयेदेखील खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षाही लेखी स्वरूपात घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. यंदा ठाणे जिल्ह्यातून ९४ हजार ९४१ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी मुख्य केंद्रासह उपकेंद्रही उभारण्यात आले असून विद्यार्थ्यांचे महाविद्यालये किंवा शाळा हेच उपकेंद्र आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात यंदाच्या वर्षी एकूण ४१९ केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्ह्यात ५ भरारी पथके तैनात करण्यात आलेली असून, जिल्ह्यातील ६ अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रांवर पथकांचे विशेष लक्ष असणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 000 students for higher secondary school examinations akp
First published on: 04-03-2022 at 00:21 IST