रासायनिक रंगांमुळे वृक्षांना अपाय होत असल्याचा दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्ते रुंदीकरण, बिल्डरांच्या विकास प्रकल्पांसाठी ठाणे शहरातील शेकडो झाडांची बिनधोकपणे कत्तल सुरू असताना आता महापालिकेच्या शहर सौदर्यीकरणाचा फटका हिरव्यागार झाडांना बसू लागला आहे. महापालिका मुख्यालयालगत असलेल्या कचराळी तलावाचे रूपडे पालटण्याच्या नादात या भागातील झाडांच्या खोडांना रंग चढविला जात असून यामुळे पर्यावरणतज्ज्ञ आणि प्रेमी कमालीचे अस्वस्थ आहेत. झाडांच्या खोडांना अशा प्रकारे रंग चढविला गेल्यास त्यांचे आयुष्य कमी होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे असून महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग मात्र यासंबंधी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करू, असा दावा करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chemical colours damaging trees
First published on: 10-01-2017 at 02:37 IST