मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यात बेमुदत उपोषण पुकारले आहे. टोल दरवाढ झाल्याने हे उपोषण सुरू केले असून मनसे नेहमी आक्रमक भूमिका घेते असा ठपका आहे. हा ठपका पुसण्याकरता हे उपोषण सुरू करण्यात आलं असल्याची प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

अविनाश जाधव म्हणाले की, “आतापर्यंत अनेक अधिकारी भेटून गेले. जिल्हाधिकारी आणि तहसीलदारचे अधिकाही भेटायला आले होते. १ तारखेपासून जी टोल दरवाढ झाली आहे, त्याला तत्काळ स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे. त्याबाबतीत ते ठोस निर्णय द्यायला तयार नाहीत. त्यामुळे उपोषण सुरू ठेवलं आहे. “

Badlapur case, school trustees Badlapur case,
बदलापूर प्रकरण : …तर शाळेच्या विश्वस्तांना अद्याप का शोधू शकला नाहीत ? उच्च न्यायालयाचा पोलिसांना संतप्त प्रश्न
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Manager Fired HR
मॅनेजरचा CV क्षणार्धात नाकारला, एचआरची नोकरीच गेली; नेमकं काय घडलं वाचा!
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
Hafkin Corporation has not benefited from ashwasit pragati yojana even after rahul narvekar promise
‘आश्वासित प्रगती’चे आश्वासनच? राहुल नार्वेकर यांना हाफकिनचा विसर पडल्याची कामगारांची खंत
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
badlapur rape case high court
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : शालेय मुलांच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर नाही का? समिती अद्याप कागदावरच असल्यावरून उच्च न्यायालयाचा संताप
Live in relationship
“लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सज्ञान जोडप्यांना संरक्षण दिलं पाहिजे, मग ते विवाहित असले तरीही”, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

हेही वाचा >> “एकनाथ शिंदेंना मला प्रश्न विचारायचा आहे की…”, टोल दरवाढीसंदर्भात राज ठाकरे संतापले, म्हणाले…

मागच्या अनेक वर्षांपासून समाजात एक ठपका आहे की मनसे नेहमी आक्रमक आंदोलन करते. तोडफोड करते. या ठपक्यासाठी माझं हे शांततेचं आंदोलन होतं. पण त्यांनाही कळूदेत की मनसे स्टाइलने आंदोलन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रिझल्ट मिळतो, पण शांततेत आंदोलन करताना आठ आठ दिवस बसावं लागतं. त्यामुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेलाच मार्ग योग्य होता. आमच्या हातची भाषा कळत नाही तोवर निर्णय होत नाही. आमचा गांधी सप्ताह आज संपणार आणि उद्यापासासून भगतसिंहांचा मार्ग अवलंबणार, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला आहे.

“टोलनाक्याविरोधातील आंदोलनाची सुरुवात धर्मवीर आनंद दिघेंनी १९९९ साली सुरू केली होती. त्यावेळेला हा टोल सुरूही झाला नव्हता. २०१६ मध्ये एकनाथ शिंदे यांनी याचिकाही दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने असं म्हटलं होतं की स्वतः मंत्री महोदयांनी निर्णय घ्यावा. त्यानंतर ते मंत्री झाले तेव्हा त्यांनी याचिका मागे घेतली.आता टोलबंदीवर सोडा, टोल दरवाढीवरही ते काही बोलत नाहीत, अशीही टीका त्यांनी केली.

राज ठाकरेंनी घेतली भेट

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी उपोषण मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अविनाश जाधव आता उपोषणा मागे घेणार आहेत. उपोषण मागे घेतल्यानंतर मनसे या प्रश्नी काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.