ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास भागात रस्ता ओलांडत असताना सोमवारी रात्री दुचाकीच्या धडकेत सत्यम बर्मन (४८) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली

हेही वाचा – म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिवंडी येथील टेमघर भागात सत्यम बर्मन वास्तव्यास होते. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ते पिंपळास येथील भूमी वर्ल्ड परिसरातून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी दुचाकीची त्यांना जोरदार धडक बसली. या घटनेत सत्यम यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे सत्यम यांच्या कुटुंबियांनी कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.