अबिद सुरती यांच्याकडून मीरा-भाईंदरमधील शेकडो रहिवाशांची मोफत नळ दुरुस्ती; पाणी वाचवण्यासाठी ‘ड्रॉप डेड’ संस्थेची स्थापना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात भीषण दुष्काळ पडला असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब आणि थेंब महत्त्वाचा आहे. पण शहरी भागात अनेकांच्या घरात नळ गळत असतात आणि त्यातून किती तरी लिटर पाणी वाया जात असते. या गळक्या नळांकडे नेहमीच दुर्लक्ष होते, पण ते दुरुस्त करण्याची तसदी कधीही घेतली जात नाही.. ही तसदी घेतली आहे आबिद सुरती नावाच्या ८० वर्षीय ‘जलमित्रा’ने. वय झाले तरी आराम न करता सुरती हे दर रविवारी एक प्लंबर सोबत घेतात आणि मीरा-भाईंदरमधील प्रत्येक रहिवाशाच्या घरी जाऊन गळणारा नळ शोधून त्याची दुरुस्ती करतात, तीही मोफत. पाण्याचा प्रत्येक थेंब सत्कारणी लागावा या जाणिवेतूनच हे सत्कृत्य करीत असल्याचे सुरती सांगतात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of one man saving water in bhayander
First published on: 29-03-2016 at 10:44 IST