Mumbai local kelvan video: असं म्हणतात मुंबईचं काळीज ही मुंबईचीलोकल आहे. जी २४ तास लोकांच्या सेवेत अविरत चालू असते. उन्हाळा असो किंवा पावसाळा प्रत्येक ऋतूत ती आपली साथ सोडत नाही. शिवाय न थकता आपल्या मुक्कामापर्यंत सुरक्षित पोहचवते. मुंबईची लोकल ट्रेन आणि गर्दीची सवय आता लोकांना झाली आहे. या गर्दीतून वाट काढत मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतो. मात्र, सणवार आले की मुंबईकर लोकल ट्रेनला एखाद्या घरासारखं रुप येतं. मग अगदी दसरा दिवाळीपासून हळदी-कुंकवापर्यंत सर्वकाही या लोकलमध्ये साजरं केलं जातं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे ज्यामध्ये महिलांच्या डब्यामध्ये एका प्रवाशी तरुणीचं थाटात केळवण करण्यात आलंय. या हटके केळवणाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

घरात एखादे लग्नकार्य असेल की हमखास केळवणाची आमंत्रणे मिळतात. यापूर्वी केवळ नवरीचे केळवण करण्याची पद्धत होती त्याचे कारण आपण लेखात पुढे पाहूया, मात्र आता अनेकदा लग्नाआधी नवरा नवरी दोघांनाही मित्रमंडळी, आप्तेष्टांकडून केळवणाचे आमंत्रण दिले जाते. काही ठिकाणी तर वर- वधूच्या आई वडिलांना सुद्धा आग्रहाने बोलावले जाते. या केळवणासाठी गडगनेर असा दुसरा शब्दही आहे. गडगनेर म्हणजे काय तर, गडू आणि नीर यापासून हा शब्द बनला आहे. गडू म्हणजे पाण्याचा तांब्या आणि नीर म्हणजे पाणी. गडगनेर म्हणजे नुसतेच तांब्याभर पाणी नव्हे तर पाहुण्यांसाठी मेजवानी, अशा अर्थाने तो वापरला जातो. आता रोजच्या धावपळीमुळे घरी बोलावून केळवण करणे सर्वांनाच शक्य होत नाही. अशाच काही महिलांनी आपल्या सहप्रवासी मैत्रीणीचं थेट लोकलमध्येच केळवण केलंय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, खोपोली ट्रेनममध्ये खास केळवणासाठी जबरदस्त असं डेकोरेशन केलं आहे. केळीची पानं, डेकोरेशनसाठी फुलांच्या माळा, होणाऱ्या नवरीचे फोटो असं सगळं हटके डेकोरेशन करण्यात आलंय. एवढंच नाहीतर नवरीसाठी खास गोडाधोडाचे पदार्थ दिले आहेत. अगदी घरी करतो तसं केळवण लोकलमध्ये या महिलांनी केलं आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by @5.33_csmt_khopoli

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. उमेश करंबेळकर यांच्या लेखात केळवणाच्या संदर्भात अनेक दाखले दिसून येतात. ते सांगतात की, केळवण म्हणजे काळजी घेणे किंवा काळजीपूर्वक सांभाळणे, असाही एक अर्थ आहे. केळीची लागवड केल्यास त्या पिकाची नीट मशागत करावी लागते. काळजी घ्यावी लागते. नाहीतर केळीची रोपे सुकून जातात. त्यामुळे लग्न ठरलेल्या वधूची माहेरी ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते, त्याप्रमाणे ती सासरीही घेतली जावी, हा कदाचित केळवणामागील मूळ उद्देश असावा.