Viral video: घरातील जेष्ठ मंडळी सांगतात हॉटेलमध्ये जाऊन खाऊ नका.कारण हॉटेलमध्ये तयार होणाऱ्या अन्न-पदार्थामधील स्वच्छतेबाबत काय संशय असतो. अनेक मोठमोठ्या हॉटेलच्या किचनमध्ये अक्षरश: उंदीर, पाली, झुरळं फिरत असतात. काही हॉटेल्समध्ये खाद्यतेल सुद्धा दुषित स्वरूपात वापरलं जातं.असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.म्हणूनच घरचं पौष्टिक खाण्याचा सल्ला दिला जातो. फळे खा पौष्टक असतात हेसुद्धा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. मात्र आता विचार करा की, फळांमध्येही विष आहे असं तुम्हाला कुणी सांगितलं तर…कुटुंबाचं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टरही फळे भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात.
पण तुम्ही विकत घेतलेली फळे ही गटाराच्या पाण्यात धुतलेली आहे असं कळलं तर नक्कीच मोठा धक्का बसेल. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत विक्रेता विक्रीसाठी ठेवलेले ताडगोळे चक्क गटाराच्या पाण्यात बडवून स्वच्छ करत विकत असल्याचा संतापजनक प्रकार दिसत आहे.मेथीची भाजी असो की इतर कोणती पालेभाजी. या पालेभाज्या किंवा फळे कुठे धुतली जातात हे आपण कधी बघितलंय का? याआधी पालेभाज्या गटाराच्या पाण्यात धुतल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका परप्रांतीय विक्रेत्यानं विक्रीसाठी ठेवलेले ताडगोळे चक्क गटाराच्या पाण्यात धुतले. या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हिडओ पाहून सोशल मीडियावर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बाजारात विकल्या जाणाऱ्या भाज्यांच्या अस्वच्छतेबाबतही अनेकांनी संताप आणि चिंता व्यक्त केली आहे. आरोग्यदायी आहारात हिरव्या भाजा, फळे समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर अनेकदा देत असताना, मात्र आताा अशा प्रकारामुळे अनेकांना त्यांच्या अन्नाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाहा व्हिडीओ
खेडमधील ही घटना आहे. येथील तहसील कार्यालयासमोर हा परप्रांतीय विक्रेता ताडगोळे विकत होता. त्यानं विक्रीसाठी ठेवलेले ताडगोळे गटाराच्या पाण्यात धुतले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या परप्रांतीय विक्रेत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ tez_marathi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “यांच्यावर लगेच कारवाई करा” तर आणखी एकानं “आता खायचं तरी काय, एकदाच घ्या लोकांचा जीव घ्या”” अशी प्रतिक्रिया दिली आहे.