“जन गण मन…अधिनायक जय हे…राष्ट्रगीताचे हे बोल कानावर पडताच प्रत्येक भारतीय नागरिक जिथे आहे तिथेच स्तब्ध अवस्थेत उभा राहतो आणि भारतीय राष्ट्रगीताचा मान राखला जातो. भारतीय राष्ट्रगीताचा मान राखणे प्रत्येक भारतीय व्यक्तींचे कर्तव्य आहे. शालेय वयापासून प्रत्येकालाच राष्ट्रगीत तोंडपाठ असते. आजच्या काळात शाळा, चित्रपटगृह किंवा काही कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत गायले जाते पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, हैद्राबादमधील एका कॅफेमध्ये रोज सकाळी राष्ट्रगीत गायले जाते. या सुंदर क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हैदराबादच्या रामेश्वरम कॅफेमध्ये दररोज राष्ट्रगीत गायले जाते. कॅफे सकाळी ६:३० वाजता लोकांसाठी उघडतो. सकाळी साडेपाच वाजताच सर्व कर्मचारी राष्ट्रगीत सज्ज होतात. सर्वप्रथम, सर्वजण सावधान अवस्थेत उभे राहतात आणि समूह गायन करत राष्ट्रगीत गातात. त्यानंतर भारत माता की जयच्या घोषणाही दिल्या जातात. रात्री एक वाजेपर्यंत कॅफे सुरू राहतो.

राष्ट्रगीताने सकारात्मकतेची सुरुवात होते

सकारात्मकता आणि एकतेने दिवसाची सुरुवात करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. रेस्टॉरंट व्यवस्थापनाचा असा विश्वास आहे की,”या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल तर वाढतेच पण ग्राहकांना एक विशेष संदेशही जातो.”

हेही वाचा –केरळमध्ये उत्सवादरम्यान पिसाळला हत्ती! व्यक्तीला सोंडेत पकडून हवेत फेकले; थरारक घटनेचा Video Viral

हेही वाचा – “हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!”असे म्हणतात, पण इथे तर उलटंच घडलं, Viral Video पाहून पोट धरून हसाल

सोशल मीडियावर चर्चा

ही बातमी व्हायरल झाल्यानंतर, एका सोशल मीडिया वापरकर्त्याने प्रश्न उपस्थित केला की, “ही परंपरा सर्व कार्यालये, मॉल्स आणि कामाच्या ठिकाणी देखील स्वीकारली पाहिजे का? त्यावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी त्याचे कौतुक करून इतर ठिकाणी त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रगीत गाणे हे केवळ देशभक्तीचे प्रतीक नाही तर लोकांना एकत्र आणण्याचा आणि शिस्त लावण्याचा एक मार्ग आहे. रामेश्वरम कॅफेचा चा हा उपक्रम समाजातील सकारात्मक बदलाचे उदाहरण ठरू शकतो.