वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बराच काळापासून रुढ आहे. मात्र मागील काही वर्षांपासून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून घरी आणून त्याची पुजा कारणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढल्याचं चित्र दिसत आहे. दर वटपौर्णिमेला यासंदर्भातील जनजागृती करणारे मेसेज सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असतात. मात्र एकीकडे केवळ वटपौर्णिमेच्या दिवशीच वडाचं महत्व वाढतं असं समजणारे, वडाच्या झाडाच्या फांद्या कापून घरी आणणारे असतात तर दुसरीकडे तामिळनाडूमधील एका आजींनी आपलं संपूर्ण आयुष्य वडाची झाडं लावण्यासाठी खर्च केलंय. जाणून घेऊयात याच आजींबद्दल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ साली सालाबादप्रमाणे प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी असणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार विजेत्यांमध्ये यादीमध्ये तामिनाडूमधील पाच जणांची नावं होती. मात्र त्यातही सर्वात खास नाव होतं ते एका १०६ वर्षांच्या आजीबाईंच. सालुमार्दा थिमक्का असं या आजींचं नाव. या आजी आज १०८ वर्षांच्या आहेत. पर्यावरणासंदर्भातील योगदानासाठी त्यांना २०१९ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. हुलिकलजवळ त्यांनी अंदाजे ७० वर्षांपूर्वी वडाची ३८४ झाडे लावली आणि त्यानंतर त्यांनी झाडे लावण्याचा सपाटाच सुरु केला. त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना २०१९ साली ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vat purnima special environmentalist padma shri saalumarada thimmakka planted 384 banyan trees scsg
First published on: 24-06-2021 at 13:57 IST