Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या आयुष्याची सुरुवात करतात. एकमेकांना साथ देण्याचे आणि चांगल्या वाईट प्रसंगी कायम बरोबर राहण्याचे वचन देतात. लग्नानंतर हळू हळू नाते फुलत जाते. एकमेकांना गुण दोषांसह स्वीकारले जाते. चांगल्या वाईट काळात एकमेकांना साथ दिली जाते. जीवनातील चढउतार आणि वाटेला आलेल्या संघर्षाला एकत्र येऊन हिमतीने सामना केला जातोएकमेकांच्या चुका पदरात घेतल्या जातात. जसे जसे वर्ष वाढतात तसे नाते आणखी घट्ट होतात. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी, विश्वास दिसून येतो. त्यामुळे नवरा बायकोचे नाते हे जगावेगळे असते. सध्या असाच एका वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जे त्यांचा लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. ५० वर्ष त्यांनी एकत्र संसार केला, त्या संसाराचा गोडवा तुम्हाला या व्हिडीओत दिसून येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला मोठा मंडप दिसेल. काही पाहुणे मंडळी दिसतील. स्टेजवर आजी आजोबा उभे दिसेल. ते एकमेकांना हार घालताना दिसत आहे. आज्जी आजोबा भावुक झाले आहे. जेव्हा ते हार घातल्यानंतर खूर्चीवर बसतात तेव्हा आज्जीला अश्रु अनावर होतात. ते एकमेकांना मिठी मारतात. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ

mayurdushingfilms या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “डोळ्यात आनंदाचे अश्रूच सांगतात एकमेकांना वर किती प्रेम आहे ते” तर एका युजरने लिहिलेय, “माहीत नाही का ,पण डोळ्यात पाणी आलं” आणखी एका युजरने लिहिलेय, ‘इथपर्यंत पोहचायला खूप नशीब लागतं” एक युजर लिहितो, “एवढं आयुष्य सोबत जगायलाही नशीबच लागतं. यांनी काय काय दुःख सोसले असतील ना खरंच यांच्या ५० वर्षाच्या प्रवासात, लगेचच अश्रू अनावर झाले नाही ताईंना. खुप छान दादा अशीच साथ दया शेवटपर्यंत ताईंना. आणखी काही नकोय आम्हा बायकांना” तर एक युजर लिहितो, “५० वर्षांचा संसार – प्रेम, संयम आणि एकमेकांची साथ यांचं खरं उदाहरण!”