वसई-विरार महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई:  वसई-विरार शहराच्या विकास आराखडय़ाची २० वर्षांची मुदत संपली तरी शहरातील ८८३ आरक्षणे विकसित करण्यास महापालिकेला अपयश आले आहे. यामुळे या आरक्षणांवरील महापालिकेचा हक्क देखील संपुष्टात आला आहे. विकासकामांसाठी आरक्षित जागा नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसला आहे.  या प्रकरणी महापालिकेला २१ फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. वसई-विरार उपप्रदेशसाठी सिडको ने २००१ ते २०२१ साठी  विकास आरखडा तयार केला होता. जुलै २०१० मध्ये  विकास नियंत्रण प्राधिकरणाचे अधिकार वसई -विरार महापालिकेकडे हस्तांतरित झाले होते.  विकास आराखडय़ामध्ये वेगवेगळय़ा सुविधांसाठी आरक्षित ठेवलेले  शासकीय व खाजगी भूखंड ताब्यात घेऊन ते विकासित करण्याची जबाबदारी  सिडको तसेच महालिकेची होती. विकास आरखडा लागू होऊन २० वर्षे तसेच शासनाच्या मंजुरीस  एकूण १३ वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनसुद्धा विकास आराखडय़ाची अंमलबजावणी झालेली नाही.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Development reserved plots wind ysh
First published on: 01-02-2022 at 00:02 IST