वसई : वसईत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने बाजी मारली आहे. ग्रामपंचायतीच्या १५ पैकी ९ जागांवर बविआचे सरपंच निवडून आले आहेत. तर दोन ठिकाणी भाजप, तीन अपक्ष तर एका जागेवर श्रमजीवी संघटनेचा सरपंच निवडून आला आहे. वसईतील  १५ ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदासाठी ४६ उमेदवार रिंगणात उतरले होते. यातील नऊ ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे सरपंच निवडून आले आहेत. यात पाणजू, पारोळ, करंजोन, मालजीपाडा,  टीवरी, खार्डी डोलीव, वासलई, नागले, तरखड- आक्टण या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कळंब आणि टेम्भी कोल्हापूर या दोन ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळविला आहे. तिल्हेर, खोचिवडे, रानगाव या तीन ग्रामपंचायतींवर गाव परिवर्तन व गाव संघर्ष समितीचे सरपंच निवडून आले आहेत. तर टोकरे खैरपाडा या ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेने बाजी मारली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उज्वला भगत, नायब तहसीलदार चंद्रकांत पवार, प्रत्येक विभागनिहाय नेमलेले निवडणूक विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मतमोजणी शांततेत पार पडली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gram panchayats election 2022 win vasai hitendra thakur bahujan vikas aghadi ysh
First published on: 21-12-2022 at 01:04 IST