वसई– वसई- भाईंदर रोरो सेवेला आठवडा पूर्ण झाला असून नागरिकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना या रोरो सेवेचा अधिकाअधिक लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रवासी कर पुढील एक वर्षासाठी माफ केला आहे. त्यामुळे वाजवी दरात नागरिकांना रोरो सेवेचा आनंद घेता येणार आहे.

वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे.  सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्दीसेस या कंपनी मार्फत रोरे ही चालविली जात असून या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवासी अशी आहे. २० फेब्रुवारी पासून ही सेवा सुरू झाली असून त्याला आठवडा पूर्ण झाला आहे. या सेवेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा >>>भाईंदरच्या आझाद नगर मध्ये झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पर्यटनाला चालना मिळावी आणि अधिकाअधिक नागरिकांना या सेवेचा उपभोग घेता यावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने या रोरो सेवेचा प्रवासी कर यापूर्वीच माफ केला आहे. त्यामुळे २०२४ या वर्षात प्रवाशांवर रोरो सेवेचा प्रवासी कर नसल्याने वाजवी दरात ही सेवा मिळणार असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. सध्या ही सेवा पुढील ३ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू राहणार आहे. आवश्यकतेनुसार बदल करून नंतर पूर्ण क्षमतेने सेवा दिली जाणार आहे.