भाईंदर : मिरा रोड येथे एका पिसाळलेल्या श्वानाने लहान मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात मुलाच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर इजा झाली असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दक्ष रावत(८) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. मिरा रोडच्या पूनम सागर परिसरात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.हा मुलगा याच भागात राहत असून रात्री मित्रांसोबत खेळत होता.यावेळी एक भटका श्वान त्यामागे लागला. त्याने प्रतिकार करण्याच्या आतच भटक्या श्वानाने त्याच्या तोंडावर आणि डोक्यावर चावे घेतले.मुलाने आराडा- ओरडा केल्याने त्याची सुटका झाली. मात्र तो पर्यंत मुलाच्या शरीरातून रक्ताच्या झरा वाहू लागल्या होत्या.कुटुंबियांनी त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.मुलाच्या तोंडाला गंभीर जखम झाल्याने प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Congo
Congo Mass Murder : ‘काँगो’मध्ये बंडखोरांच्या हल्ल्यानंतर भीषण नरसंहार! तुरूंगातील शेकडो महिलांवर बलात्कार करून जिवंत जाळलं
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Rwanda backed rebels enter in Congo city
आफ्रिकेत पुन्हा संहाराची चाहूल
vishal gawli
कल्याण पूर्वेत बालिका अत्याचार हत्येमधील कुटुंबीयांच्या घरासमोर तरुणांची दहशत; “जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो…”
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
anti narcotics squad arrested three ganja smugglers in Dombivli seizing 30 kg worth Rs 6 lakh
डोंबिवलीत सहा लाखाच्या गांजासह तीन जणांना अटक, मध्यप्रदेशातून रेल्वेतून गांजा डोंबिवलीत
Bihar Class 10 Girl Accident
घराच्या छतावर अभ्यास करणाऱ्या मुलीला माकडाने दिला धक्का, खाली पडून १० वीतल्या मुलीचा मृत्यू
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…

हेही वाचा : सुनावणीच्या पहिल्याच दिवशी थंड प्रतिसाद ग्रामस्थांचा बहिष्कार, बोगस हरकतींचा आरोप

दिवसाला सरासरी ४० जणांना श्वान दंश

मिरा भाईंदर शहरात भटक्या श्वानाचा उपद्रव मोठया प्रमाणात वाढला आहे. शहरात जवळपास ३० हजार भटके श्वान असून ते टोळीने नागरिकांवर हल्ला करत आहेत. जानेवारी महिन्यापासून आता पर्यंत जवळपास १२ हजाराहून अधिक जणांना श्वानदंश झाल्याची नोंद झाली आहे. त्यानुसार शहरात दर दिवसाला ४० जणांना श्वानदंश होत असून पालिका प्रशासनाच्या उपायोजना कागदावरच असल्याचे आरोप होत आहेत.

Story img Loader