वसई : मीठ उत्पादन होण्याचा हंगामाला प्रारंभ होताच वसई विरार भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा परिणाम हा सर्वच क्षेत्रावर झाला असून त्याचा परिणाम वसईच्या पारंपारिक व्यवसाय असलेल्या मीठ उत्पादनावर झाला आहे. मीठ उत्पादन करण्याचे काम आता महिनाभर लांबणीवर पडले आहे. वसई विरार भागातील मीठ उत्पादन हा पारंपारिक व्यवसाय आहे. एकेकाळी हा व्यवसाय अधिक जोमाने सुरु होता पंरतु विविध प्रकारच्या निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे हा व्यवसाय अडचणीत सापडत आहे. ,असे असतानाही वसईच्या भागात  काही मीठ उत्पादन मीठ पिकवीत आहेत.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून वसईच्या मिठागरात चोपणे, पाणी जमा करणे, त्याची योग्य ती डिग्री तयार करणे अशा मीठ पिकविण्यासाठीच्या विविध प्रक्रियांच्या कामाला सुरवात होत असते. काही भागात मजुरांना बोलावून कामही सुरू केले होते. त्यातच रविवारी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. यामुळे यावर्षी सुद्धा मीठ पिकविण्याचे काम लांबणीवर गेले आहे. जवळपास २० दिवस ते एक महिना हे काम लांबणीवर पडणार असल्याने निघणाऱ्या वार्षिक उत्पादनावर याचा मोठा परिणाम होणार असल्याचे मीठ उत्पादकांनी सांगितले आहे.

Guava, price, low price Guava,
पेरूला कवडीमोल भाव, बागा काढून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Satara, rain, koyna, koyna news,
सातारा : जोरधार आठव्या दिवशीही सुरूच; कोयनेचा धरणसाठा ७१ टीएमसी; रस्ते खचले, बंधारेही वाहून गेले
corn, Scarcity, Poultry Business,
देशात मक्याचा खडखडाट, प्रतिकिलो ३० रुपयांवर; कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम
Zika, Pune, rural areas, patients,
पुण्यात झिकाचा धोका वाढला! ग्रामीण भागातही शिरकाव; जाणून घ्या कुठे वाढताहेत रुग्ण…
Thane Water Crisis, Thane Water Crisis Deepens, Main Distribution water System Failure in thane, thane water problems, thane news,
ठाण्यात पाणी टंचाईचे संकटात भर, मुख्य वितरण व्यवस्थेमध्ये बिघाड
Traffic Indiscipline Soars in Nashik, Automatic Signals in nashik, Traffic Police to Enforce Stricter Measure in nashik, e chllan in nashik, e challan, e challan penalty, nashik news,
नाशिक : बेशिस्त वाहनचालकांना लवकरच इ चलनव्दारे दंड
panvel water supply
पनवेल: पावसाळ्यात बुधवार व गुरुवार सिडकोवासियांचा पाणी पुरवठा बंद राहणार
Vasai industries marathi news
वसईतील उद्योग गुजरातला स्थलांतरणाच्या मार्गावर, सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार; उत्पादनावर परिणाम

हेही वाचा : वसई : पायातील धाग्यावरून लावला हत्येचा छडा, तरुणाच्या हत्या प्रकरणात तिघांना अटक

“मीठ उत्पादनाची मुख्य सुरवात करण्याच्या कामाच्या वेळीच अवकाळी पाऊस कोसळला आहे. आता सर्व कोंड्यामध्ये पाणी साचून राहिले आहे.त्यामुळे प्रत्यक्ष मीठ पिकविण्याचे काम हे महिनाभर उशिराने सुरू होईल. उशीर होणार असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.” – हेमंत घरत, मीठ उत्पादक

दूषित पाण्यामुळे डिग्री तयार होण्यास अडचणी

वाढत्या शहरीकरण यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी हे खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे खाड्या प्रदूषित होऊन  सुरवातीला पाण्याचा जो खारट पणा आहे तो कमी झाला आहे त्यामुळे मिठ तयार होण्यासाठी आवश्यक डिग्री तयार करावी लागते त्यातही आता अडचणी येत आहेत असे मीठ उत्पादक व्यावसायिकांनी सांगितले आहे.