लोकसत्ता प्रतिनिधी

वसई: पतंग उडविताना गच्चीवरून पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. कार्तिक सुभाष रेवाळे (१३) असे या मुलाचे नाव आहे. विरार पूर्वेच्या साईनाथ नगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रात आल्याने आतापासूनच पतंग उडविण्यासाठी लहान मुले व तरुणाईने सुरुवात केली आहे. विरार पूर्वेच्या साईनाथ नगर मधील साई वैष्णवी अपार्टमेंट मध्ये राहणारा कार्तिक रेवाळे (१३) हा मुलगा शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास इमारतीच्या गच्चीवर पतंग उडवत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांसाठी अंमली पदार्थ तस्करी, दीड कोटींचे अंमली पदार्थ जप्त

पतंग उडवत असताना अचानक त्याचा तोल जावून तो खाली कोसळला. त्याच्या छाती व पोटावर गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.