वसई: नव्याने निर्माण करण्यात आलेल्या आचोळे पोलीस ठाण्याला पोलिसांच्या मनुष्यबळाची कमतरता भेडसावत आहे. दुसरीकडे आचोळे आणि तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दींची माहिती नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडू लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर आणि ठाणे ग्रामीण पोलिसांचे विभाजन करून ‘मीरा -भाईंदर वसई विरार’ या नव्या पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली आहे. यापूर्वी वसई-विरार शहरात वसई, माणिकपूर, वालीव, नालासोपारा, तुळींज, अर्नाळा सागरी अशी सहा पोलीस ठाणी होती. मात्र वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यंचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आणखी चार नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यात बोळींज, पेल्हार, आचोळे आणि मांडवी या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. त्यापैकी नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्याचे विभाजन करून आचोळ पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. एव्हरशाईन येथे हे पोलीस ठाणे उभारण्यात आले आहे. २ ऑक्टोबर रोजी या नव्या पोलीस ठाण्याचे औपचारीक उद्घाटन करण्यात आले होते. मात्र या पोलीस ठाण्याला मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of manpower in the new achole police station zws
First published on: 19-10-2021 at 02:44 IST