लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : भरधाव वेगाने जाणार्‍या टँकरने धडक दिल्याने आजी आणि ५ वर्षीय नातवाचा जागीत मृत्यू झाला आहे. विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे शुक्रवारी दुपारी हा अपघात घडला.

gondia, boy died, drowning, mine,
गोंदिया : मुरमाच्या खाणीतील खड्ड्यात आंघोळ करणे जिवावर बेतले; मुलाचा बुडाल्याने मृत्यू
Kerala Nipah Virus
Kerala Nipah Virus : चिंताजनक! निपा विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; केरळ सरकारने म्हटले…
bhaindar uttan marathi news
भाईंदरच्या उत्तन येथील घटना, खड्ड्यात बुडून ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
Shiv Sena deputy leades son hit a couple with a car Mumbai
धनिकपुत्राची दांडगाई! शिवसेना उपनेत्याच्या मुलाची मोटारीने दाम्पत्याला धडक, दोन किलोमीटरपर्यंत फरफटल्याने महिलेचा मृत्यू
court sentence life imprisonment till death for molesting minor girl zws
अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार; शेजाऱ्याला मृत्यूपर्यंत जन्मठेप तर आजोबाला १० वर्षे सक्तमजुरी
man died, contractor, seat of lift,
उदवाहकाची जागा ठेकेदाराने मोकळी सोडल्याने ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Contract doctor dismissed in case of child death in gadchiroli 
गडचिरोली : उपचारात हलगर्जीपणा भोवला ! बालकाच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटी डॉक्टर बडतर्फ; लोकसत्ताच्या वृत्ताची दखल
Death of an infant due to open DP of Mahavitran in vasai
महावितरणाच्या उघड्या डीपी मुळे चिमुकल्याचा मृत्यू

विरार पश्चिमेच्या भागात ग्लोबल सिटी परिसर आहे. या भागाला अजूनही पालिकेकडून पाणी पुरवठा न झाल्याने येथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भागात पाण्याचा टँकर आला होता. याच वेळी अमरावती यादव (५७) ही महिला तिचा ५ वर्षाचा नातू विवान यादव याला शाळेतून घेऊन येत होती. टँकर मागील बाजूने वळण घेत असताना मुलगा व आजी दोघेही टँकरच्या चाकाखाली आले. यात विवानचा जागीच मृत्यू झाला तर आजी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-राज भगतने रचला इतिहास! वसईतून स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होणारा पहिला तरूण ठरला

या घटनेनंतर टँकर चालक फरार झाला आहे. अर्नाळा सागरी पोलीस फरार टँकर चालकाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून टँकर चालकांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या महिन्यातील टँकर अपघाताची दुसरी घटना आहे. २ एप्रिल रोजी विरारच्या जकात नाका येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला टँकरने चिरडले होते यात किरण टाक (३५) या महिलेचा मृत्यू झाला होता.