लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई- विवाहबाह्य संबंध हे आणि संशय नेहमी सुखी संसारात बाधा आणत असतात. वसईतील एक महिला अशाच संशयाची बळी ठरली. २५ वर्षांपूर्वी असलेल्या प्रेमसंबंधामुळे घरात होणार्‍या वादाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे.

Malegaon Bomb Blast Case Final Argument Begins Today Mumbai
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण :आजपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात, खटल्याची सुनावणी शेवटच्या टप्प्यात
Loksatta lokrang North Block Culture
निमित्त:  नॉर्थ ब्लॉक संस्कृती
Crime News
१५ वर्षांपूर्वी झालेल्या महिलेच्या हत्येचं रहस्य निनावी पत्रामुळे उलगडलं, कुठे घडली घटना?
Horoscope Shasha Raja Yoga is created due to retrograde Saturn
शनी करणार मालामाल! वक्री शनीमुळे निर्माण झाला शश राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् प्रत्येक कामात यश
girlfriend genitals cut news
धक्कादायक! ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने महिलेचं क्रूर कृत्य, प्रियकराचे गुप्तांग कापून…
Madhya Pradesh Alirajpur suicide
मध्य प्रदेशात एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांचा गळफास, बुराडी सामूहिक आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती, तारीखही तीच
Kidnap, boy, Nandivali,
कल्याणमध्ये नांदिवलीतून अल्पवयीन गुराख्याचे अपहरण
Social Process, post-violence,
‘समाजप्रक्रिया’ हिंसेनंतरची आणि पूर्वीचीही

आणखी वाचा-नितीन गडकरींच्या ठाकूरस्नेहामुळे भाजपची कोंडी; विरारमध्ये कार्यक्रम भाजपाचा, वर्चस्व ठाकूरांचे

वसई पश्चिमेच्या निर्मळ येथे राहणार्‍या शाम जयस्वाल (४२) याचे बबिता (४०) बरोबर २५ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. मात्र लग्नापूर्वी बबिता हिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पती शामला मिळाली. या जुन्या प्रेमसंबंधामुळे पती श्याम जयस्वाल याला सतत सशंय यायचा आणि नेहमी भांडणे व्हायची. या भांडणाला शनिवारी संध्याकाळी बबिताने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यापूर्वी देखील तिने दोन वेळा गळफास घेऊन आत्महत्या करण्याच प्रयत्न केला होता, असे तिच्या पतीने वसई पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी वसई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.