अ‍ॅड. तन्मय केतकर

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, हे आपण अगदी प्राथमिक शाळेपासून शिकत आलेलो आहोत. एकेका टप्प्यावर उत्क्रांत होत होत मानवाचा एकसंध समाज होता तो विविध धर्म, जाती, भाषा अशा निकषांवर विभागला गेला. गेल्या काही वर्षांमध्ये तर ही विभागणी अधिकाधिक तीव्रतेने आणि जाहीरपणे जाणवायला लागलेली आहे.विविध ठिकाणी एकेका समाजातील लोकांनी कळपाने राहणे आणि इतर समाजातील लोकांना मालमत्ता विक्री न करणे हे प्रकार हल्ली राजरोस सुरू आहेत. मालमत्ता विक्रीच्या जाहिराती देतानासुद्धा जात, धर्म, भाषा, आहार पद्धती या आधारे ठरावीक लोकांनाच मालमत्ता विक्री केली जाईल असे स्पष्ट लिहिण्यात येते. त्याव्यतिरिक्त इतर धर्म, भाषा, जात, आहारपद्धतीच्या लोकांना विक्रीस आणि खरेदीस केवळ त्याच कारणास्त्व स्पष्ट मनाई करण्यात येते.

May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण

या मुद्दय़ाचा विचार करताना कायदेशीर आणि सामाजिक दोन्ही अंगांनी विचार होणे आवश्यक आहे. प्रथमत: कायद्याचा विचार करता कोणत्याही व्यक्तीस केवळ त्याच्या धर्म, जात, भाषा, आहारपद्धती यावरून मालमत्ता विक्री नाकारणे गैर आहे आणि त्याविरोधात यथोचित फौजदारी आणि दिवाणी कायदेशीर कारवाई होऊ शकते. अर्थात ही कायदेशीर लढाई तशी सोप्पी नाही, कारण अशा जाहिरातींवर बंदी घातली तर असे प्रकार छुपेपणाने होतच राहतील. आपल्याकडे माणसाच्या नावाने, आडनावाने त्याच्याबद्दल प्राथमिक माहिती जाहीर होत असते. या माहितीच्या आधारे धर्म, जात, भाषा, आहारपद्ध च्या आधारावर नाकारली जाईल. एखाद्याने आपली मालमत्ता कोणास विकावी आणि कोणास नाही यावर कायदेशीर ती हे मूळ मुद्दे जाहीर न करता मालमत्ता विक्री व्यावहारिक किंवा स्वेच्छाधिकारा नियंत्रण आणणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे आव्हान पेलणे तसे सोप्पे नाही.

दुसरा आणि जास्त महत्त्वाचा मुद्दा

आहे तो म्हणजे सामाजिक. विविधतेत एकतेच्या आपण कितीही गप्पा केल्या तरी आपल्याकडे आजही धार्मिक, जातीय, भाषिक आणि आहाराविषयी भावना सदैव विशेष महत्त्वाच्या राहिलेल्या आहेतच. गेल्या काही काळापासून त्या भावनांची तीव्रता वाढलेलीच आहे. अशा वेळेस आतल्या आत संकोच होत जाणाऱ्या समाजाला जास्तीतजास्त सामावेशक करण्याचे काम कायद्यापेक्षा प्रबोधनच अधिक करू शकेल. दुर्दैवाने तसे झाले नाही आणि हा सामाजिक संकोच असाच होत राहिला तर आपल्या समाजाची धर्म, भाषा, जात, पोटजाती, आहारपद्धती या आधारांवर असंख्य शकले होतील आणि विविधतेत एकतेच्या नुसत्या गप्पा उरतील.