“महाविद्यालयाचं कामकाज सुरु होताना त्याची सुरुवात राष्ट्रगीतानं झाली पाहिजे, असा निर्णय आम्ही यापूर्वी घेतला होता. महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवातही राष्ट्रगीतानं व्हायला हवी, असंही आमचं म्हणणं होतं. त्या निर्णयाला अनुसरुन याबाबतचा आदेश १९ फेब्रुवारीला शासकीय शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही निर्गमित करणार आहोत. याबाबतचं परिपत्रक १९ तारखेला प्रत्येक कॉलेजमध्ये जाईल. या निर्णयामुळे दरदिवशी १५ लाख विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतील. असा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातलं हे पहिलं राज्य आहे.” असं उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.