Uddhav Thackeray on Fadnavis: ‘राज्यात दुष्काळ असताना जपानला गेले’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज हिंगोलीत निर्धार सभेच्या निमित्ताने गेले असून तेथे त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीसांना सणसणीत टोले लगावले. ”राज्यात दुष्काळ पडलेला असताना फडणवीस जपानला गेले. तिकडे डॉक्टरेट घेतली आणि परत आले.. तुमचा हा प्रयत्न उत्तम आहे. परंतु तुमच्या सरकारमध्ये जे प्रकल्प जपानला गेले ते माघारी आणाल का? मोदीजी म्हणाले होते मोठा उद्योग देतो, कुठेय उद्योग?” असा सवालही त्यांनी केला