राज ठाकरेंनी आज गुढी पाडवा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. आज राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी आपण शिवसेना प्रमुख वगैरे काहीही होणार नाही हेदेखील स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे मी स्वार्थाचं राजकारण केलं नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.