जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे बसपाच्या नेत्या मायावती यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुकाही पक्षाने स्वबळावर लढल्या होत्या.
महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुकांमध्ये बसपाची कामगिरी निराशाजनक झाली, असे विचारले असता मायावती म्हणाल्या की, अन्य पक्षांनाही विशेष कामगिरी करता आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला जनतेने अनुकूलता दर्शविली, असेही त्या म्हणाल्या.
परदेशातील काळा पैसा आणि गंगा शुद्धीकरण या प्रश्नांवरूनही मायावती यांनी मोदी यांच्यावर टीका केली. महागाई नियंत्रणात ठेवण्यातही सरकार अपयशी ठरल्याचे त्या म्हणाल्या.