लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला तरी काँग्रेस नेत्यांनी काही बोध घेतलेला दिसत नाही. पक्षाच्या राज्याच्या कारभारावर दिल्लीचा अंकुश राहील याची नेतृत्वाने खबरदारी घेतली आहे. पराभवानंतरही विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या निवडीसाठी पक्षाचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्रीपदाची निवड करण्याकरिता दिल्लीहून निरीक्षक येणे, सोनिया गांधी यांना सर्वाधिकार देणारा एक ओळीचा आमदारांनी ठराव करणे मग दिल्लीहून नेत्याची निवड हे सारे काँग्रेसमध्ये वर्षांनुवर्षे सुरू असते. पराभवानंतही विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीकरिता दिल्लीहून खरगे यांना निरीक्षकपदी पाठविण्यात येणार आहे. ते आमदारांचे म्हणणे ऐकून घेतील, मग निर्णय जाहीर करतील. नेतेपदासाठी वाद असल्याने एक ओळीचा ठराव करण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नेतेपदी निवड करायची असल्यास पक्षश्रेष्ठींना सर्वाधिकार आणि दिल्लीहून घोषणा होऊ शकते. अर्थात, चव्हाण यांच्या नावास आमदारमंडळींचा विरोध आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बाळासाहेब थोरात, डॉ. पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे-पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तथापि, चर्चेतील एकही नेता त्या पदासाठी योग्यतेचा नाही, असा थेट हल्लाच नारायण राणे यांनी चढवून वादात ठिंगणी पाडली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2014 रोजी प्रकाशित
काँग्रेसच्या कारभारावर दिल्लीचाच अंकुश!
लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला तरी काँग्रेस नेत्यांनी काही बोध घेतलेला दिसत नाही. पक्षाच्या राज्याच्या कारभारावर दिल्लीचा अंकुश राहील याची नेतृत्वाने खबरदारी घेतली आहे.
First published on: 05-11-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress send executive from delhi to choose legislative leader in maharashtra