बारावे येथील जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवारी, ७ नोव्हेंबर रोजी कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा सकाळी आठ ते रात्रौ आठ या वेळेत बंद राहणार आहे. कल्याण-डोंबिवली शहराच्या कोणत्याही भागाला या काळात पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी केले आहे.