मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा-टॅक्सींच्या मीटर रिकॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ देताना परिवहन विभागाची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा उघड झाली आहे. मुदतवाढ देणार नाही आणि वाहनांवर कारवाई करणार अशी भूमिका घेणाऱ्या परिवहन विभागाने अखेर कामगार संघटनांच्या दबावाला बळी पडून मुदतवाढ दिली आहे. त्याचप्रमाणे मेकॅनिकल मीटरबाबत संभ्रमाची भूमिका घेतल्यानेच रिक्षा-टॅक्सींच्या रिकॅलिब्रेशनचे त्रांगडे वाढत चालले आहे. मेकॅनिकल मीटरचे रिकॅलिब्रेशन करणे हे अत्यंत जिकिरीचे आणि वेळकाढू असल्याचे परिवहन विभागाचेच म्हणणे आहे. त्याचप्रमाणे मॅकॅनिकल मीटर बाद करून त्याऐवजी ई-मीटर लावण्यासाठी राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्यात आदेश काढून १ डिसेंबरपासून ई-मीटर सक्तीची केली आहेत. रिक्षासाठी ई-मीटर लावण्याची अंतिम मुदत ३१ मार्च असून टॅक्सीसाठी ३१ एप्रिल ही अंतिम मुदत आहे. या काळात सर्व मीटर्स ही ई-मीटर्स करण्यात येणार आहेत. अशावेळी मॅकॅनिकल मीटरचे कॅलिब्रेशन करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याचे कोणतेही कारण नव्हते. सर्व मीटर्स ई-मीटर होत असल्यामुळे त्यांचे रिकॅलिब्रेशन करण्यात येत नव्हते. उलट अशा रिक्षा-टॅक्सीचालकांना एकदम ई-मीटर लावण्याचाच आग्रह धरण्यात येत होता. तरीदेखील मॅकॅनिकल मीटरला मुदतवाढ देऊन परिवहन विभागाने आणखी गोंधळ निर्माण केल्याचा आरोप केला जात आहे.
फक्त कबुली; कारवाई शून्य!
रिकॅलिब्रेशनसाठी असलेल्या तीन संस्थांकडून पुरेशा प्रमाणात मीटर्स रिकॅलिब्रेट होत नसल्याची कबुली परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी स्वत:च दिली होती. शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचीही मदत घेण्याचा प्रयत्न परिवहन विभागाने मध्यंतरी केला. मात्र त्यांनीही मदत देण्यास वेगवेगळ्या कारणामुळे असहाय्यता दाखविली. ४५ दिवसांच्या मुदतीमध्ये १५ दिवस सुट्टय़ांचे होते आणि ३० दिवस काम सुरू होते असे मुदतवाढ देण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले असले तरी प्रत्यक्षात हे सर्व दिवस परिवहन विभागाची विभागीय कार्यालये सुरू ठेऊन रिकॅलिब्रेशनचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तथापि, ५० टक्क्यांच्या आसपास सर्व रिक्षा-टॅक्सींचे रिकॅलिब्रेशन झाले नाही, असा दावा केला जात आहे. रिकॅलिब्रेशनबाबत गांभीर्य न दाखविणाऱ्या परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे आणि परिवहन सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2012 रोजी प्रकाशित
रिक्षा-टॅक्सी मीटरचे रिकॅलिब्रेशन:
मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा-टॅक्सींच्या मीटर रिकॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ देताना परिवहन विभागाची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा उघड झाली आहे. मुदतवाढ देणार नाही आणि वाहनांवर कारवाई करणार अशी भूमिका घेणाऱ्या परिवहन विभागाने अखेर कामगार संघटनांच्या दबावाला बळी पडून मुदतवाढ दिली आहे.
First published on: 11-12-2012 at 11:18 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw taxi meter recalibration tranceport department prays towards union