महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने दिलेल्या आदेशानुसार २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांच्या मूल्यमापनाचे कामकाज मुख्य नियामक, वरिष्ठ नियामक हे नियामक व परीक्षण करणार नाहीत, असे पत्रक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. एस. बी. उमाटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
विद्यार्थी व पालकांचे हित लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी महासंघाच्या आदेशानुसार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वी भाषा विषयांच्या तोंडी परीक्षा, विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा घेतलेल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळास व राज्य शासनास सहकार्य केले आहे. २१ फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या लेखी परीक्षेचे पर्यवेक्षणाचे कामकाज शिक्षक करणार आहेत; पण शासनाने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, असेही पत्रकात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2013 रोजी प्रकाशित
बारावी लेखी परीक्षेच्या मूल्यमापनावर शिक्षक संघाचा बहिष्कार
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने दिलेल्या आदेशानुसार २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांच्या मूल्यमापनाचे कामकाज मुख्य नियामक, वरिष्ठ नियामक हे नियामक व परीक्षण करणार नाहीत, असे पत्रक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. एस. बी. उमाटे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
First published on: 18-02-2013 at 07:58 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers union boycott on evaluation of 12th written examination