Kolkata Rape : कोलकाता या ठिकाणी महिला डॉक्टरवर बलात्काराची ( Kolkata Rape ) घटना घडल्याने सगळा देश हादरला. यामुळे मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशात भारतातली लोकप्रिय इन्फ्लुएन्सर तान्या खानिजोने एक पोस्ट लिहिली आहे. कृपा करा आणि भारतात येऊ नका असं आवाहन तिने जगातल्या मुलींना केलं आहे. त्यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे.

नेमकी काय घडली घटना?

कोलकाता या ठिकाणी एका महिला डॉक्टरवर बलात्कार ( Kolkata Rape ) करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या घटनेने कोलकातासह देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. अशात लोकप्रिय इन्फ्लुएन्सरने जगभरातल्या मुलींना आणि महिलांना भारतात येऊ नका असं आवाहन केलं आहे. ९ ऑगस्टला कोलकात्यातील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ३१ वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. तसेच मृतदेहावर अर्धवट कपडे होते. या घटनेनंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. महिला डॉक्टरवर बलात्कार ( Kolkata Rape ) आणि हत्या प्रकरणात कोलकातामध्ये निदर्शनंही करण्यात आली.

तान्या खानिजोची पोस्ट काय?

तान्याने पोस्ट करत म्हटलं आहे, “भारतात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. विदेशांत राहणाऱ्या माझ्या सगळ्या महिला मैत्रिणींना मी आवाहन करते आहे की कृपा करुन भारतात येऊ नका. आमच्या देशात जोपर्यंत महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होत नाही, आमचे नेते त्याविषयीचा कठोर निर्णय घेत नाहीत तोपर्यंत काहीही झालं तरीही भारतात येऊ नका.” या आशयाची पोस्ट तान्याने केली आहे.

हे पण वाचा- Kolkata Doctor Rape Case : “पीडितेला न्याय देण्याऐवजी…”, कोलकाता बलात्कार प्रकरणात राहुल गांधींचा गंभीर आरोप; म्हणाले, “कोणत्या विश्वासाने…”

तान्याच्या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया

तान्याने केलेल्या या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक म्हणत आहेत की बलात्काराची ( Kolkata Rape ) एक घटना घडल्यानंतर तान्या तू लोकांची दिशाभूल का करते आहेस? काहींनी असं म्हटलं आहे की तान्या ही पोस्ट तू केली आहेस पण ज्या राज्यात घटना घडली आहे त्या राज्याच्या मुख्यमंत्री एक महिला आहेत. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर तू देशाला दुषणं का देत आहेस? असा प्रश्न काही लोकांनी विचारला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तान्याने टीका करणाऱ्यांना दिलं उत्तर

तान्याने या पोस्टनाही उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, “मी ही पोस्ट केली आहे कारण जोपर्यंत महिला सुरक्षेकडे आपण लक्ष देत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही. मी स्वतः देशभरात फिरले आहे. अनेकदा शोषणही सहन केलं आहे. मात्र जोपर्यंत कठोर कारवाईची तरतूद केली जात नाही तोपर्यंत महिलांना आपण सुरक्षित वातावरणात आहोत.” असं म्हणत तान्याने तिच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तरही दिलं आहे. तान्या पुढे म्हणते, “ही एकच घटना नाही, आत्तापर्यंत अनेक घटना देशात घडल्या आहेत. तुम्ही महिलांना विचारुन बघा मला खात्री आहे की त्या सांगतील की त्यांना कधी ना कधीतरी त्रास सहन करावा लागला आहे.” असं असलं तरीही अनेक लोकांना तान्याची पोस्ट पटलेली नाही. काही जणांनी तिला पाकिस्तानात जाण्याचाही सल्ला दिला.