बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी आणि माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची विधाने परस्परविरोधी असून त्यामुळेच सत्ताधारी पक्षात फुटीची शक्यता असल्याचा दावा भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.
आगामी विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढायची याबाबतही त्या पक्षामध्ये संभ्रमाची स्थिती आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या निकटचे मंत्री आगामी निवडणूक मांझी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत.