मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जिल्हा सांस्कृतिक आघाडीच्यावतीने दुष्काळग्रस्त गावांना पाण्याच्या टाक्या
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
उसाला पहिली उचल तीन हजार रूपये मिळावी व गतहंगामातील उसाला ५०० रूपयांचा हफ्ता मिळावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. काल (रविवार) उसाला पहिली उचल २ हजार ३०० रूपयांची देण्याचा निर्णय जाहिर झाल्यानंतर संतप्त शेतकरू संघटनांनी आद (सोमवार) राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचा उशारा दिला होता. मात्र, या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांना आज (सोमवार) पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अज्ञातस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच आंदोलन स्थळावरून सुमारे दीड ते दोन हजार शेतकऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना इंदापूरमधील एका सभागृहात ठेवण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या तीन जिल्ह्यातील कारखानदारांच्या बैठकीत उसाला पहिली उचल २ हजार ३०० रूपयांची देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान २ हजार ३०० रूपयांच्या पहिली उचलीवर शेतकरी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया नोदवल्या आहेत.
रविवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती, ऊसाची उपलब्धता, बँकेने दिलेली रक्कम आणि स्वाभिमानीची मागणी या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. यानंतर महाडिक यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीनही जिल्ह्यात २३०० रूपये विनाकपात दर देणार असल्याचे जाहीर करत, संघटनेशी यावेळी चर्चा करण्याचा प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगितले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















