ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट अंतराने भ्रमण करतात आणि इतर ग्रहांशी युती करतात, ज्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो. अशातच आता २५ जुलै रोजी बुध ग्रहाने स्वतःच्या राशीत प्रवेश केला आहे, जिथे तो मंगळ आणि शुक्र या ग्रहांशी युती करत आहे. म्हणजे सिंह राशीत या तीन ग्रहांची युती होणार आहे. या युतीचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होईल, परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांच्या इच्छा या युतीच्या काळात पूर्ण होऊ शकतात. तसेच त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
कुंभ रास (Kumbh Zodiac)
कुंभ राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग तयार होणं शुभ सिद्ध होऊ शकते. कारण हा योग तुमच्या राशीतून सातव्या स्थानी तयार होत आहे. तसेच शनीची समसप्तक दृष्टी संबंध देखील तयार होत आहेत. त्यामुळे तुमची लव्ह लाईफ चांगली राहू शकते. त्याच वेळी, तुम्हाला अपघाती पैसे देखील मिळू शकतात. तसेच भागीदारीच्या कामात लाभ होऊ शकतो. दैनंदिन उत्पन्नही चांगले होऊ शकते. यासोबतच तुमच्या गोचर कुंडलीत शश आणि केंद्र त्रिकोण राजयोग देखील तयार होत आहेत. त्यामुळे या काळात तुमच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते, तसेच आत्मविश्वासातही वाढ होण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Zodiac)
शुक्र, मंगळ आणि बुध यांची युती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीच्या लग्न स्थानी तयार होत आहे. तसेच लाभ आणि संपत्तीचा स्वामी तुमच्या राशीत स्थित आहे. या बरोबर सुख आणि साधनांचा स्वामी मंगळ देखील तुमच्या राशीत विराजमान आहे. तसेच कर्माचा स्वामी शुक्रही तुमच्या राशीत विराजमान आहे. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. परंतु यावेळी तुम्हाला वाहन आणि मालमत्ता मिळू शकते. तसेच बेरोजगारांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. या काळात व्यावसायिकांना नफा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- ‘गजकेसरी राजयोग’ बनताच ‘या’ राशींना अचानक धनलाभ होणार? करिअर आणि व्यवसायात मोठं यश मिळण्याची शक्यता
तूळ रास (Tula Zodiac)
तूळ राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. कारण या योगामुळे तुमच्या राशीवर शनीची समसप्तक दृष्टी राहू शकते. कारण ही युती तुमच्या उत्पन्नाच्या स्थानी होत आहे. लाभ राशीचे स्वामी आणि भाग्य स्वामी आणि वैवाहिक जीवनाचा स्वामी देखील शुभ स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कोणता व्यवसाय करत असाल तर या काळात तुमच्या व्यवसायात भरभराट होऊ शकते. नोकरदारांचे प्रमोशन होऊ शकते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)