Chanakya Niti : चाणक्य नीती ही अत्यंत लोकप्रिय आहे. आचार्य चाणक्य हे एक महान त्वत्वज्ञानी आणि राजकारणी होते. आचार्य चाणक्य हे अत्यंत प्रसिद्ध असे राज‍नीतिचे पंडित होते. चाणक्यांचे जन्मनाव विष्णुगुप्त होते आणि चणक नावाच्या आचार्याचे ते पुत्र असल्याने त्यांचे नाव चाणक्य असे पडले. त्यांनी आयुष्यात नैतिकतेचे धोरण पाळून नीती तयार केल्या आहेत. या नीतीमध्ये त्यांनी माणसाने आदर्श जीवन कसे जगावे, हे सांगितले आहे. त्यामुळे

चाणक्य यांच्या नीतीचा अनेक जण अवलंब करतात आणि आयुष्यात खूप पुढे जातात. चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये विविध पैलूंविषयी सांगितले. या नीतीद्वारे त्यांनी राजनैतिक, सामाजिक, आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग त्यांनी दाखवला. त्यांनी त्यांच्या नीतीमध्ये आर्थिक बाबींविषयी महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहे. आचार्य चाणक्य सांगतात की काही घरात पैसा टिकत नाही. त्यामागील त्यांनी कारण सुद्धा सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते, पैसे कमवणे खूप सोपी आहे पण त्या पैशांना वाचवणे खूप कठीण आहे. तसेच योग्यरित्या पैशांचा वापर प्रत्येकाला करता येत नाही. जर योग्यरित्या पैसे वाचवायचा प्रयत्न करत नसाल तर एक श्रीमंत व्यक्ती सुद्धा गरीब होऊ शकते. खरं तर आपल्या सवयी सांगतात की आपल्या हातात पैसा टिकतो की नाही.

कोणत्या घरी पैसा कधीही टिकत नाही व कोणते लोक नेहमी आर्थिक अडचणीमध्ये असतात याविषयी चाणक्य काय सांगतात, आज आपण जाणून घेणार आहोत.

चाणक्य यांच्या मते ज्या घरात स्वच्छता नसते, अशा अस्वच्छ घरापासून माता लक्ष्मी नेहमी दूर राहते त्यामुळे त्या घरात पैसा टिकत नाही.

चाणक्य म्हणतात की स्वच्छ कपडे सुद्धा घालणे गरजेचे आहे. याचा थेट संबंध पैशांशी येतो. जे अस्वच्छ कपडे घालतात, त्यांच्याकडे पैसे टिकत नाही.

चाणक्य यांच्या मते दात स्वच्छ राखणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे यामुळे घरात पैसा टिकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्य उगवण्यापासून मावळेपर्यंत, या दरम्यान जर तुम्हाला झोपण्याची सवय असेल तर अशा घरी पैसा कधीही टिकत नाही. चाणक्य यांच्या मते, आळशीपणाचा त्याग केला पाहिजे आणि स्वच्छतेवर लक्ष दिले पाहिजे.