लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक मंगळवारपासून सुरू झाली. ही बैठक तीन दिवस चालणार असून, त्यात व्याजदरांचा आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ न होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे. या बैठकी तीन निर्णयांची घोषणा गुरुवारी (१० ऑगस्ट) केली जाणार आहे. मागील वर्षी मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ सुरू केली होती. रेपो दर फेब्रुवारी महिन्यात ६.५ टक्क्यांवर पोहोचले. त्यानंतर मात्र एप्रिल व जूनमधील पतधोरण समितीच्या सलग दोन बैठकांत रेपो दरात बदल करण्यात आलेला नाही.

हेही वाचा – Gold-Silver Price on 9 August 2023: सोने खरेदी करणाऱ्यांची लागली लाॅटरी, किमतीत चमत्कारिक घसरण, १० ग्रॅमचा दर ऐकून लोकांच्या उड्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाव खाल्लेला टॉमेटो नडणार?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, महागाईतील वाढ चिंताजनक आहे. असे असले तरी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ केली जाणार नाही. व्याजदर स्थिर ठेवून अर्थचक्राची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याचबरोबर इतरही भाज्यांचे भाव वाढू लागले आहेत. मात्र आधीही असे प्रकार घडले त्या वेळी व्याजदरात बदल झालेला नव्हता.

हेही वाचा – क्रेडिट कार्ड थकीत देणी ४ हजार कोटींवर

महागाईवर रिझर्व्ह बँकेचे बारकाईने लक्ष आहे. भाज्यांसह आवश्यक खाद्यान्नांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जागतिक पातळीवरील अनिश्चितता पाहता बँकेकडून सावध पवित्रा घेतला जाईल आणि व्याजदर स्थिर ठेवले जातील. – ध्रुव अगरवाल, प्रमुख, हाऊसिंग डॉट कॉम